05-07-2019
स्वरा भास्कर आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग राइटर हिमांशु शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. तब्बल ५ वर्षापासून त्यांचे नाते होते. ते कायम एकमेकांसोबत होते. मात्र आता त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.
हे जोडपे २०१५ पासून रिलेशनशिप मध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा आणि हिमांशू हे एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत. हिमांशु अलीकडे स्वराच्या भावाच्या लग्नात देखील शामिल झाला होता. हे दोघे एकमेकांपासून वेगळे होतील वाटले नव्हते. मात्र त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नेमक कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
....05-07-2019
बाहुबली फेम अभिनेता प्रभास हिंदी चित्रपट सोहात मुख्य भूमिका करत आहे. हे आपल्याला माहितीच आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमानची आवडती हिरोईन जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.
या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे.
.......05-07-2019
नवी दिल्ली- आधी इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे.
आता पॅनकार्ड शिवाय देखील इनकम टॅक्स भरू शकता. इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे. पॅनकार्ड ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं.
.......05-07-2019
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होताच लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झाली. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरले नाही.
बजेट दरम्यान निफ्टी ११२ अंकांनी कमी होऊन ११८३४ अंकांवर आला आहे. तर सेन्सेक्स ३५० पेक्षा जास्त अंकांनी घसरण होऊन ३९५५० च्या स्तरावर आला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीत घसरण सुरू आहे.
बँकेच्या डिजिटल देवाण घेवाणीवर चार्ज लागू झाल्यामुळे बँक निफ्टीत जोरदार घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टीत ६४ अंकांची घसरण होऊन ३१४०७ अंकांवर पोचली आहे.
.......05-07-2019
नवी दिल्ली- आधी इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे.
आता पॅनकार्ड शिवाय देखील इनकम टॅक्स भरू शकता. इनकम टॅक्स भरण्यासाठी आपल्याला पॅनकार्ड लागायचे. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे. पॅनकार्ड ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं.
.......02-07-2019
नवी दिल्ली – भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या पुत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच भडकले. आमदार आकाश विजयवर्गीय यांचा एका महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या घटनेवर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणाचाही मुलगा असो त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे नाव न घेता मोदी यांनी सुनावले.
मोदी म्हणाले कि, कोणात्याही नेत्याच्या मुलाचे असे वर्तन सहन केले जाणार नाही. या कृत्याचे समर्थन केले आहे. त्यांनाही पक्षात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्या सर्वांना पक्षातून बाहेर काढायला हवे, अशा कडक शब्दात मोदींनी सुनावले.
.......03-07-2019
मुंबई - तब्बल ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. यात १९ जण बेपत्ता असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दुर्घटनेवरून धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सरकारवर चांगला निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे की, ‘रत्नागिरीतील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
भावपूर्ण श्रद्धांजली! अद्याप १६ जण बेपत्ता आहे. सरकारने तातडीने मदत करावी.
सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत. परत स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतोय. जागे व्हा सत्ताधाऱ्यांनो!
03-07-2019
बीड – राज्यातील शेतकऱ्याची अवस्था आणखी बिकट आहे. बीड जिल्ह्यात पेरणीसाठी पैसे नसल्याने एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.त्याचे कर्ज केवळ १ लाख ३० च्या जवळपास होते. मात्र ते फेडण्यासाठी त्याची परिस्थिती नव्हती. म्हणून त्यांनी आत्महत्या केली.
तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे उघडकीस आली आहे.
बाळासाहेब रामभाऊ गायकवाड (वय- ४०) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
सततच्या नापिकी आणि कर्जाला कंटाळून बाळासाहेब यांनी पहाटे ५ च्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.बाळासाहेब गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी व तीन लहान मुले आहेत
02-07-2019
पुणे – सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय मुंबई येथे पोस्ट, ईमेल, कुरिअर, फॅक्स अथवा प्रत्यक्ष जमा करायचे आहेत.
.......05-07-2019
बाहुबली फेम अभिनेता प्रभास हिंदी चित्रपट सोहात मुख्य भूमिका करत आहे. हे आपल्याला माहितीच आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमानची आवडती हिरोईन जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.
या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे.
.......05-07-2019
स्वरा भास्कर आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग राइटर हिमांशु शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. तब्बल ५ वर्षापासून त्यांचे नाते होते. ते कायम एकमेकांसोबत होते. मात्र आता त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.
हे जोडपे २०१५ पासून रिलेशनशिप मध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा आणि हिमांशू हे एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत. हिमांशु अलीकडे स्वराच्या भावाच्या लग्नात देखील शामिल झाला होता. हे दोघे एकमेकांपासून वेगळे होतील वाटले नव्हते. मात्र त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नेमक कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
.......02-07-2019
मुसळधार पावसामुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत केले आहे. त्यात आता याचा फटका सामान्यांसह बॉलिवूड कलाकारांना देखील सहन करावा लागत आहे.मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यात जुहूमध्ये सर्वाधिक पाणी साचले आहे.यामुळे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील मुंबईच्या स्थितीवर भाष्य केले आहे.
त्यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली.दरम्यान स्वतः अमिताभ यांनी मुंबईच्या पावसावर एक ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी पावसामुळे हाल होणाऱ्या प्रवांशांबद्दल चिंता व्यक्त न करता महागरपालिकेवरच ताशेरे ओढले आहेत.
बच्चन यांनी त्यांच्या सिनेमातील एक फोटो शेअर केला. यात त्यांच्यासोबत झिनत अमान देखील आहेत. यात ते एका होडीत बसले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘दादा, जरा गोरेगावला न्या’. या फोटोच्यावर त्यांनी टी ३ ‘जलसावरून..’ असा मेसेजही लिहिला.
.......03-07-2019
विश्वचषकतील उपांत्य फेरीसाठी खेळला जाणारा सामन्यात भारताने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. त्यादरम्यान ८७ वर्षांच्या आजींनी भारताला हातात भली मोठी पिपाणी घेऊन चेअर केल.सामना संपेपर्यंत त्या आजी एवढ्या प्रसिद्ध झाल्या की भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्वतः त्यांची भेट घेतली.
विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आजीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.फक्त विराटच नाही तर रोहित शर्मानेही या आजींची भेट घेतली.
मात्र सध्या सोशल मीडियावर विराटच्या या भेटीच वैयक्तीक कौतुक केलं जात आहे.
सोशल मीडियावर विराटचे चाहतेच नाही तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने देखील विराटचे कौतुक केले आहे.
सामना संपल्यानंतर विराटने आजींसोबतचे काही फोटो शेअर केले. आणि खास संदेश लिहिला. त्यात तो म्हणाला की, ‘एवढ्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी सगळ्या चाहत्यांचे धन्यवाद खास करुन चारुलता पटेल यांचे आभार.
.......02-07-2019
बर्मिंगहॅम – इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर आता भारताला उपांत्य फेरीत स्थान बळकट करण्यासाठी बांगलादेशविरूद्धचा आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे. विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश अशा महत्वपूर्ण लढतीस काहीच वेळात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
.......01-07-2019
भारतीय संघाने काल इंग्लंडसोबतचा सामना गमावला. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी धोनीवर खापर फोडले तर काही जणांनी टीम इंडियाची जर्सी भगवी असल्याने त्यांचा पराभव झाल्याचे सांगितले आहे.
टीम इंडियाने भगवी जर्सी घातल्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचे महबूबा मुफ्ती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की मी अंधविश्वास ठेवत नाही,मात्र हे खर आहे की, टीम इंडियाने भगवी जर्सी घातली त्यामुळेच ते इंग्लंडशी तब्बल २७ वर्षांनी पराभूत झाले आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाची जर्सी भाजपमुळे भगवी केली आहे. त्यामुळेच संघ पराभूत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
.......22-06-2019
बारामती – शहरात सध्या गुन्हेगारी वाढत आहे. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. खाटीक गल्ली परिसरात एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. या हल्ल्यात महिला गंभीर रित्या जखमी झाली असून उपचारासाठी तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
खाटीक गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अरबाज उर्फ अबू कुरेशी याने तांदळवाडी येथे राहत असलेल्या जबीन गुलाब कुरेशी या महिलेच्या घरात शिरून तिच्यावर सत्तुराने हल्ला केला. आरोपीने या महिलेच्या मानेवर, तोंडावर आणि हातावर वार केले. यामध्ये ही महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.
.......24-02-2019
खानापूर येथील जाधववाडीत मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मित्राला आपलाच प्राण गमवावा लागला. या प्रेमप्रकरणातून प्राण गमवावा लागलेला युवक खानापूर युवा सेना प्रमुख होता.
यावेळी झालेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पिता-पुत्रास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की आदिनाथ भोसले व प्रमोद भगत यांच्यात एका मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून शुक्रवारी जाधववाडी येथे वाद सुरू होता. याची माहिती प्रमोदचा मित्र व खानापूर युवा सेना प्रमुख आकाश भगत याला मिळाली.
हा वाद मिटवण्यासाठी आकाश भगत, विपुल जाधव व त्याचे मित्र जाधववाडी येथे पोहोचले होते. यावेळी दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. आकाश भगत व विपुल जाधव यांच्यावर आदिनाथ भोसले, त्याचे वडील यांनी अन्य एकाच्या मदतीने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात आकाश भगत आणि विपुल जाधव हे गंभीर जखमी झाले. आकाशचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
.......
24-02-2019
२५ ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम याचा रविवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. नऊ वर्षापासून मृत्यूदंडाची शिक्षा भोगत असलेला दहशतवादी मोहम्मद हनिफचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे.
तब्बल ५२ निरपराध्यांना मृत्यूच्या दारात टाकणारा मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम हा मृत्यूदंडाची शिक्षा भोगत होता. २५ ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार होता. त्यावळी झवेरी मार्केटमध्ये झालेल्या भयावह स्फोटात ३६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १३८ जण गंभीर जखमी झाले होते तर, गेट वे ऑफ इंडियाजवळ घडवून आणलेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू तर ३६ लोकांना गंभीर दुखापत झाली होती.
.......03-07-2019
दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची ६ वी पत्नी हया बिंत अल हुसेन या आपल्या दोन मुलांसह ३१ दशलक्ष पौंड एवढी रक्कम घेऊन देश सोडून गेल्या आहेत. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
मात्र, त्यांच्या पलायनावरुन जर्मनी आणि युएई या दोन देशांत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कारण जर्मन दुतावासाने हया बिंत यांना देशाबाहेर पडण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे. हया यांना परत पाठवा अशी मागणी दुबईचे राजे शेख मोहम्मद यांनी जर्मन सरकारकडे केल्याचे समजते. मात्र त्यांना परत पाठवण्यासाठी जर्मन सरकारने विरोध केला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
.......22-06-2019
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटींचे कर्ज बुडवून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी भारतातून पळ काढला. आता भारत सरकार त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीविरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
आरोग्याचे कारण देत चोक्सीने चौकशीसाठी भारतात येण्यास वारंवार टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्याला अँटिग्वा येथून भारतात आणण्यासाठी आम्ही एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार असल्याचे ईडी यांनी सांगितले. यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्र म्हंटले आहे.
.......21-06-2019
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारतातच नव्हे तर जगभरात शक्तिशाली नेता म्हणून सिद्ध झाले आहेत. ब्रिटीश हेराल्डच्या जगातील शक्तिशाली नेत्याच्या पोलमध्ये वाचकांनी सर्वाधिक मते मोदी यांना दिली आहेत. या पोलमध्ये आतापर्यंत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंगसारख्या नेत्यांनाही स्थान मिळाले होते. मात्र, २०१९ च्या पोलमध्ये मोदींनी सर्वांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.
ब्रिटीश हेराल्डच्या या पोलमध्ये २५ हुन अधिक नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. ब्रिटिश हेराल्ड यांनी जगातील शक्तिशाली नेता निवडण्यासाठी एका विशेष पद्धतीचा अवलंब केला होता. ब्रिटिश हेराल्डने वाचकांना वन टाइम पासवर्ड दिला होता. यामुळे कोणीही एकापेक्षा अधिक वेळा मत देऊ शकत नव्हते.
.......23-02-2019
मुंबई
सलमान खानच्या प्रोडक्शनमध्ये तयार होत असलेला लव्हस्टोरी चित्रपट असलेल्या नोटबुकचे ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाले. हा चित्रपट काश्मीरवर आधारित आहे. यामध्ये एका शाळेतील दोन शिक्षकांचं प्रेम दाखविण्यात आले आहे.
या चित्रपटातून अभिनेत्री नुतनची नात प्रानुतन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. तर लीड रोलमध्ये अभिनेता जहीर इक्बाल आहे.
ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले की, शाळेतील शिक्षक त्याच शाळेत आधी शिक्षिका असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो.
.......13-02-2019
मुंबई
अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुचर्चित केसरी चित्रपटाची एक छोटीशी झलक अर्थात टीजर मंगळवारी रिलीज करण्यात आले. याआधी चित्रपटाचे अनेक पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद गोष्ट दाखवण्यात आली आहे.
राज कंवरचे असिस्टंट राहिलेले अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात भारतीय वीरांचे शौर्य दाखविण्यात आले आहे. या टीझरमध्ये अक्षय कुमार त्याच्या पलटनसोबत दिसतो. अक्षय यात सिख अवतारात दिसून येणार आहे. या चित्रपटात परिनिती चोपडा देखील मुख्य भूमिकेत दिसून येते. आज मेरी पगडी भी केसरी अशी चित्रपटाची टॅग लाईन आहे.
.......12-02-2019
इंटरनेट सेन्सेशन म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियाचा आरु अदार लव्ह वेलेंटाईन डेच्या अर्थात 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील प्रियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रियांची लोकप्रियता 24 तासात कित्येक पटीने वाढली आहे.
एक दिवसापूर्वी प्रियाचे इन्स्टाग्रामवर 2.49 लाख फॉलोवर्स होते. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 24 तासात प्रियाच्या फॉलोवर्सचा अकडा 10 लाखांवर पोहोचला आहे. याआधी प्रियांचा चित्रपटातील लीप लॉक सिन देखील व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ यूट्यूबवर आतापर्यंत 20 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
.......24-06-2019
प्रत्येक पुरूषाला असे वाटते की, आपले वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असावं. मात्र काही कारणास्तव सुखी आयुष्य जगण्यासाठी झगडत असतात. त्यामुळे अशा पुरूषांमध्ये नैराश्य भावना निर्माण होते. मात्र अशा गोष्टीवर नक्कीच मात करता येते.
तुम्ही वैवाहिक जीवनात सुखी समाधानी ही राहू शकता… त्यासाठी गरज असते योग्य उपचाराची…
जर तुम्हाला स्वप्नदोषाची समस्या असल्यास, डाळींबाचे छिलके वाळवून त्याचे चूर्ण करा, ते रोज सकाळ आणि संध्याकाळ एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.
पुरुषांनी दररोज केळ खावे. केळ हे पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे. केळ खाल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. त्यामुळे दररोज एक केळ खावे.
शारीरिक कमजोरी असणाऱ्या पुरुषांनी दररोज संध्याकाळी लसणाच्या दोन कुड्या खाव्यात. त्यानंतर पाणी प्यावे. लसूण खाल्ल्याने त्यांची शक्ती वाढते.
.......24-06-2019
लग्न हा प्रत्येक मुला मुलींच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे योग्य जोडीदार मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी लग्नापूर्वी जोडीदाराला हे प्रश्न अवश्य विचारा…
1. हे लग्न मनाविरुद्ध तर करत नाहीस ना? असे स्पष्टपणे होणाऱ्या जोडीदाराला दोघांनी विचारावे.
कारण काहीजण अनेकदा कौटुंबिक दबावाखाली लग्न करतात आणि मग दोघांचीही वाताहत होते. किंवा लग्नानंतर विभक्त होण्याची नामुष्की ओढावते.
2. लग्न करण्यापूर्वी जोडीदाराच्या नोकरीची व्यवस्थित माहिती करुन घ्या. लग्नापूर्वी
3.होणाऱ्या जोडीदाराची आवड-निवड जाणून घ्या.
4. फॅमेली प्लॅनिंगवर चर्चा करा. मुले किती आणि केव्हा हवीत, यावर बोला.
5. महत्त्वाच म्हणजे तुम्हाला एकत्र कुटुंबात राहायच किंवा स्वतंत्र कुटुंबात राहायच याची चर्चा करा.
6. कुटुंबातील व्यक्तींविषयी देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
22-06-2019