03-07-2019
मुंबई - तब्बल ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. यात १९ जण बेपत्ता असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दुर्घटनेवरून धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सरकारवर चांगला निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे की, ‘रत्नागिरीतील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
भावपूर्ण श्रद्धांजली! अद्याप १६ जण बेपत्ता आहे. सरकारने तातडीने मदत करावी.
सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत. परत स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतोय. जागे व्हा सत्ताधाऱ्यांनो!
03-07-2019
02-07-2019
02-07-2019
01-07-2019
21-06-2019