22-06-2019
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटींचे कर्ज बुडवून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी भारतातून पळ काढला. आता भारत सरकार त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीविरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
आरोग्याचे कारण देत चोक्सीने चौकशीसाठी भारतात येण्यास वारंवार टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्याला अँटिग्वा येथून भारतात आणण्यासाठी आम्ही एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार असल्याचे ईडी यांनी सांगितले. यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्र म्हंटले आहे.
02-03-2019
27-02-2019